मोहन कोठेकर
लेखक आणि ब्लोग्गर
पनामा पेपर लिक प्रकरणात जगातील मात्तबर मंडळीचे
भविष्य पणाला लागले आहे. नवाझ शरीफांच्या
चार मुलांपैकी तीन अपत्यांची नावे पाकिस्तान मधील प्रसार माध्यमांनी प्रकाशित
केल्या नंतर समाजात खळबळ निर्माण झाली आहे. तसे बघता मियां नवाझ शरीफ यांचे घराणे
हे पाकिस्तानातील अत्यंत श्रीमंत घराण्यातील एक घराणे म्हणून सर्वश्रुत आहे. खानदानी श्रीमंतीत वाढलेला नवाझ राजकारणात
शिरल्यानंतर एक दिवस प्रधानमंत्री होईल या बद्धल कोणतीही शंका नव्हती. नावाझांचा इत्तेफाक ग्रुपचा व्यापारी संबंध
पाकिस्तानापुरती मर्यादित न राहता तो सातासमुद्र पार केंव्हाचा पोहोचला आहे. लंडन मधील टोलेजंग हवेल्या ही त्यातील एक. त्यांचे उत्पन्न प्रती वर्ष दोन बिलियन डॉलरचे
आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपतविधी
समारंभात त्यांची भेट भारतातील औधोगिक घराण्यातील मंडळींशी झाली होती. तेंव्हा पाकिस्तानी वाहिन्यांनी शरीफ यांनी
भारतातील औधोगिक घराण्यातील मंडळींशी समझोते केल्याचे प्रसारित झाले होते. मोदींच्या अचानक पाकिस्तान भेटीमागे शरीफच्या भारतातील
व्यापारी संबंध हे महत्वाचे कारण असल्याची बोंब प्रसार माध्यमांनी केली होती. आता तर प्रसार माध्यमांना नवाब शरीफांच्या
विरुद्ध अपप्रचार करण्यास नव्याने संधी मिळाली आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात एवढे बघायचे.
पनामा पेपर लिक प्रकरणानंतर सर्व राजकारणी करतात तसेच
शरीफांनी केले. सर्वप्रथम पनामा पेपर लिक
प्रकरणाशी स्वतःचा संबंध नसल्याचे जाहीर केले.
हाच कित्ता भारतातील सिनेतारकांनी व इतरांनी गिरविला आहे याची कृपया नोंद
घ्या. या नंतर शरीफांनी सर्वोच्य
न्यायालयाच्या न्यायधीशाच्या अद्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार
आहे. याचा साधा आणि सरळ अर्थ हा होतो की हे प्रकरण
जास्तीतजास्त रेंगाळत ठेवायचं व सरते शेवटी गुंडाळायचे. ही राजकार्ण्यांची खेळी सर्वांना कळते. तसे बघता सर्व राजकारणी मुलतः बेरड असतात. एकदा लंगोटी काढली की सर्व आलवेल. तुरुंगात जरी गेलेत तरी तेथेही तरफदारी करणारे
मिळतात. सगळ कस गुडीगुडी असत. हे आपण नुकतेच विविध वाहिन्यांवर बघतो आहोत. जनतेची स्मृती अल्प असते याचा फायदा ही मंडळी
उठवतात. थोडक्यात त्यांचा जळी स्थळी काष्ठी
आणि पाषाणी उदो उदो होतो. तेंव्हा आपल्या मुलाचं नाव पनामा पेपर लिक
प्रकरणात आल्याचा दुखः मियां शरीफांना झाले असेल असे वाटत नाही.
भारतातील लष्कराचा सहभाग हा
सीमेचे रक्षण करणे व गरज भासल्यास सरकारला अंतर्गत भागात शांतता राखण्यासाठी,
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी केला जातो.
इतर कोणत्याही कारणांसाठी लष्कराचा उपयोग नसतो. पाकिस्तानात लष्कराची भूमिका इतर देशांच्या
लष्कराच्या तुलनेत वेगळी आहे. सरकारच्या
दैनंदिन कारभारात पाकिस्तानी लष्कराची लुडबुड चालू असते. कोणताही महत्वाचा सरकारी निर्णय लष्कराची संमती
घेतल्या शिवाय सरकारला अमलात आणता येत नाही.
यामुळे पाकिस्तानी सरकारला लष्करा समोर झुकावे लागते. त्यातच नवाझ शरीफांनी मोठ्या पदावरील नऊ लष्करी
अधिकार्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला यामुळे लष्कर शरीफांवर नाराज आहे. फक्त लष्कर प्रमुख हा पाकिस्तानात सर्वेसर्वा असतो.
त्याला सरकार नाराज करीत नाही. हे भाग्य नौदल प्रमुख आणि वायुदल प्रमुखांना
लाभलेले नाही. लष्कर प्रमुखापाठोपाठ आय एस
आय च्या प्रमुखाला पाकिस्तानात मान आहे.
या नंतर अलगाववादीचा दबदबा असतो. तेंव्हा हाती आलेली संधी लष्कर प्रमुख सोडतील
असे प्रथम दर्शनी वाटत नव्हते. यात एक मेख
आहे. पाकिस्तानच्या न्यायालयांनी माजी
लष्कर प्रमुख श्री मुशर्रफ यांना सन २००७ साली त्यांनी अंदाजे साठापेक्षा जास्त
न्यायाधीशांना पांच महिन्यांसाठी बंदिस्तवस्तेत ठेवल्याबद्दलच्या खटल्यात आरोपी
करार केले आहे. ते परदेशात आरोग्य
सुधारणेसाठी (पळून) गेलेले आहे. तेंव्हा
राहील लष्कर प्रमुख धाडसी निर्णय घेतील असे वाटत नाही. तसे झाल्यास न्यायालय कणखर भूमिका घेवू शकते. एकून न्यायालयाला पाकिस्तानात पुनः चांगले दिवस
आले आहेत असे वाटते. परंतु, गरज पडल्यास प्रधानमंत्री
बदलण्यात लष्कर प्रमुख प्रमुख यांचा सहभाग राहील हे निश्चित.
सन
१९९० ते १९९३ आणि सन १९९७ ते १९९९ पर्यंत नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान
होते. ही त्यांची तिसरी वेळ आहे. ते पाकिस्तान मुस्लीम लीग पार्टी तर्फे प्रथम सन
१९८० साली निवडून आले. सन १९८५ साली
वयाच्या ३६व्या वर्षी ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. आदरणीय अटलजी यांनी सन १९९८ ला पाकिस्तानला भेट
दिली होती. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध
सुधारले होते. परंतु कारगिल युद्धात श्री
शरीफ यांनी जी भूमिका बजाविली त्यावर लष्कर नाराज होते. श्री शरीफ यांनी मुशर्रफ यांना बरखास्त
करण्याचे ठरविले होते. ही बातमी मुशर्राफ
यांना श्रीलन्केवरून येतांना विमानात कळल्याबरोबर त्यांनी तख्त पालट केला व स्वतः
राष्ट्रपती बनले. श्री शरीफ सौदी अरेबिया यथे
सन १९९९ ते २००८ पर्यंत होते. यानंतर ते
राजकारणात नव्याने सक्रीय झाले. सन २००८
ते २०१३ पर्यंत ते विरोधी पक्षाचे नेते होते.
सन २०१३ च्या निवडणुकीत ते प्रचंड मतांनी निवडून आलेत व तिसऱ्यांदा
पंतप्रधान बनले.
विविध आतंकवादी संघटनांचा सुळसुळाट
पाकिस्तानात दिसून येतो. या संघटना
सरकारनी स्वतः च्या हितासाठी जोपासाल्यात.
या संघटनांच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारने राजकारण केले. त्यांचा उपयोग अफगाणिस्तान मध्ये सोविएत युनियन
विरुद्ध केला. हे करीत असतांना त्यांना
अमेरिकेकडून मिळालेली पैसे आणि आधुनिक शास्त्रात्रे आतंकवादी संघटनांना पुरविली. त्याच वेळेस काश्मीर आणि पंजाब मध्ये या आतन्कवाद्याकडून
वाटेल तसा धुडघूस घातला. गेली तीस पेक्षा
जास्त वर्षापासून भारतात आतंकवादी घटनांमागे पाकिस्तानचा हात आहे. याच संघटना पाकिस्तानमध्ये आपल्या कारवाया करीत
आहेत. पेशावरमधील शाळेवरचा हल्ला किंव्हा लाहोर
येथे ख्रिस्तींवर केलेला हल्ला या घटना आतंकवादी संघटनेचा सरकारवर असलेला दबाव
दर्शवितो. या शिवाय पाकिस्तानपुढे
निःसंशयपणे प्रचंड समस्या आहेत. भीषण आणि
वाढती बंडाळी, पराकोटीचे दारिद्रय, गुन्हेगारी, बेघर, बेकारी, रोजगार, शिक्षण,
प्राथ्रमिक सुविधांची कमतरता, महिलांचे अधिकार, सिंध व बलुचिस्तान मधील अलगाववाद आणि
पराकोटीची मुस्लीम धर्मांधता इत्यादी समस्यांनी देश पोखरला आहे. यातील एकही समस्याचे समाधान शरीफांचे सरकार करू
शकले नाही. यामुळे जनता सरकारवर नाराज
आहे. प्रसार माध्यमे या गोष्टीचा पुरेपूर
फायदा उचलून सरकारला धारेवर धरीत आहेत.
त्यात पनामाचे कोलीत त्यांना मिळाल्यामुळे वर्तमानपत्र तसेच वाहिन्यातून
सरकार विरुद्ध अपप्रचार होतो आहे. हे असले
तरी शरीफांना घाम फुटलेला नाही. प्रचार
माध्यमांचा दबाव सरकारवर किती पडतो यावर शरीफांचे भविष्य अवलंबून आहे. हे निश्चित की नवाझ शरीफाची लोकप्रियता घटलेली
आहे.
मध्यावधी निवडणुकीचे चिंन्ह दिसू
लागले होते. जर मध्यावधी निवडणुका झाल्यात
तर नवाझ शरीफ यांना पुन्हा निवडून येणे कठीण जाईल. त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग पार्टीला
बहुमत मिळणे कठीण जाईल. भुत्तो यांच्या
पाकिस्तान पीपल्स पार्टीला जनतेत पाठींबा नाही.
कारण बिलावल भुत्तो हे परदेशी वास्तव्व्यात आहेत आणि त्यांची पकड जनमानसात
हवी तशी नाही. जरदारी यांच्या कारकिर्दीत
जनता खुश नव्हती. इम्रान खान यांना
प्रसिद्धीचे वलय आहे. पाकिस्तान तेहेरिक ए
इन्साफ पार्टीचे ते सर्वेसर्वा आहेत.
त्यांना अजून पर्यंत शासन करण्याचा अनुभव नाही. यामुळे जनता त्यांना निवडून देवू शकते. लोकांत असाही प्रवाह आहे की पुढील निवडणुकीत
एकदम नवीन व्यक्तींना निवडून द्यायचे.
उशिरा का होईना जनतेला आपली ताकत कळली आहे हे प्रसार माध्यमातून कळते. तेंव्हा शरीफांचे देऊळ पाण्यात आहे हे
निश्चित. बघूया नजीकच्या भविष्यात
शरीफांचे पानिपत होते की काय. असे झाल्यास
राजकारण्यांना एक धडा मिळेल.
##########$$$$$$$$$$##########
No comments:
Post a Comment